News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

अरुण जेटलींची मानहानी केल्याप्रकरणी केजरीवालांवर आरोप निश्चित

FOLLOW US: 
Share:
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या पटियाला न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या पाच नेत्यांवर आरोप निश्चित केले आहेत. या सर्वांनी आपण निर्दोष असल्याचं न्यायालयात सांगितलं. 20 मे पासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात होणार आहे. भ्रष्टाचाराव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीएचे पदाधिकारी गुंतलेले आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवालांवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. मानहानीचा खटला का? भ्रष्टाचारव्यतिरिक्त अनेक गैरव्यवहारांमध्ये डीडीसीए अर्थात दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी गुंतलेले आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना केजरीवालांनी केलेला हा आरोप त्यांना आता महागात पडण्याची चिन्ह आहेत. कारण केजरीवालांच्या आरोपांमुळे डीडीसीएची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत, डीडीसीए आणि क्रिकेटर चेतन चौहान यांनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. डीडीसीएच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही डीडीसीएने आपल्या अर्जात म्हटले होते. दरम्यान, केजरीवालांच्या वक्तव्यामुळे डीडीसीएची प्रतिमा डागाळल्याचं न्यायालयाने मान्य केलं होतं. डीडीसीएचं प्रकरण नेमकं काय आहे? ‘डीडीसीए’ म्हणजेच ‘दिल्ली अँड डिस्ट्रिक्टस क्रिकेट असोसिएशन’ ही बीसीसीआयला संलग्न असलेली राज्य असोसिएशन दिल्लीतल्या क्रिकेटचं नियंत्रण करते. अरुण जेटली हे 1999 ते 2012 अशी सलग 13 वर्ष डीडीसीएचे अध्यक्ष आहेत. सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांची चौकशी करण्याचं कारण देऊन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर धाड घातल्याचं निमित्त झालं आणि आपच्या नेत्यांनी डीडीसीएतल्या भ्रष्टाचाराचा पेटाराच उघडला. अरुण जेटलींच्या 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत डीडीसीए म्हणजे आर्थिक गैरव्यवहाराचं माहेरघर बनल्याचा मुख्य आरोप आहे. दुसरा आरोप म्हणजे भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करुनही जेटलींनी कधीही कारवाई केली नाही. जेटलींच्या कारकीर्दीत डीडीसीएला फिरोजशहा कोटला स्टेडिअमसाठी नियम धाब्यावर बसवून परवानगी मिळाल्या. भारताचा माजी कसोटीवीर आणि भाजप नेते कीर्ती आझाद यांनी केलेल्या आरोपानुसार 2000 ते 2007 या कालावधीत कोटला स्टेडियमची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी एकूण 24 कोटी रुपयांचं बजेट निश्चित करण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात तो खर्च 141 कोटी रुपयांवर गेला. भाजपमध्य असूनही कीर्ती आझाद यांनी डीडीसीए आणि अध्यक्ष अरुण जेटली यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ऑगस्ट 2009 मध्ये वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशीष नेहरा आणि इशांत शर्मा यांनीही डीडीसीएच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती. अखेर भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आणि कीर्ती आझाद यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली सरकारने 12 नोव्हेंबर 2015 रोजी डीडीसीएतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती.
Published at : 26 Mar 2017 08:15 AM (IST) Tags: arun jaitly AAP defamation case अरविंद केजरीवाल अरुण जेटली दिल्ली arvind kejriwal

आणखी महत्वाच्या बातम्या

Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला

Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले

टॉप न्यूज़

EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद

EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद

वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही

वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही

उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं

उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं

धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी

धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी